नागपूर : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज–II (Nagpur Metro Rail Project)अंतर्गत कामठी, वर्धा, हिंगणा आणि भंडारा महामार्गांवर निर्माण कार्य वेगाने सुरू आहे. महामार्ग रिच–१A (खापरी ते बुटीबोरी) या मार्गावर पियर उभारणीचे ६१२ पैकी १८८ (३०.७१ %) काम पूर्ण झाले आहे. तसेच, १० पैकी ९ स्थानकांवर निर्माण कार्य सुरू झाले आहे.
ऍड ग्रेड येथील ईको पार्क आणि नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल मेट्रो स्टेशन येथे फाउंडेशन, पहिला व दुसरा मजला तसेच रूफ स्लॅबचे काम पूर्ण झाले असून सध्या पीईबीचे काम सुरू आहे. याशिवाय अशोकवन ते बुटीबोरी या मार्गावरील ८ मेट्रो स्थानकांचे निर्माण कार्य सुरू आहे. या मार्गावरील 590 पैकी 48 (8.13%) गर्डर स्पॅन पूर्ण झाले आहेत. तसेच ३ पैकी २ स्टील ब्रिजचे कामही प्रगतीपथावर आहे.
*नागपूर मेट्रो फेज–II चा विस्तार :*
फेज– II अंतर्गत एकूण ४३.८ किमी लांबीच्या मार्गावर ३२ मेट्रो स्थानकांचा समावेश असून हा टप्पा नागपूर शहराच्या उपनगरांपर्यंत विस्तारित होणार आहे.
यामध्ये खापरी ते MIDC ESR (१८.५ किमी, १० स्थानके) या मार्गाचा समावेश असून ईको पार्क, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल, अशोकवन, डोंगरगाव, मोघाव, मेघदूत CIDCO, बुटीबोरी पोलीस स्टेशन, म्हाडा कॉलनी, MIDC KEC आणि MIDC ESR ही मेट्रो स्थानके प्रस्तावित आहेत.
नागपूर मेट्रोच्या फेज– II मुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होऊन उपनगरांशी संपर्क सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
**********************************************************************************
- *महा मेट्रो : खापरी से बुटीबोरी मेट्रो कॉरिडोर का कार्य तेज गति से जारी*
नागपुर : नागपुर मेट्रो रेल परियोजना के फेज– I के अंतर्गत कामठी, वर्धा, हिंगणा और भंडारा महामार्गों पर निर्माण कार्य तेज गति से प्रगति पर है। महामार्ग रिच–1A (खापरी से बुटीबोरी) मार्ग पर पियर निर्माण का 612 में से 188 (30.71%) कार्य पूर्ण हो चुका है। साथ ही, 10 में से 9 मेट्रो स्टेशनों पर निर्माण कार्य शुरू है।
एड ग्रेड स्थित ईको पार्क तथा नेशनल कैंसर हॉस्पिटल मेट्रो स्टेशन पर फाउंडेशन, प्रथम एवं द्वितीय तल तथा रूफ स्लैब का कार्य पूर्ण हो गया है और वर्तमान में पीईबी का कार्य प्रगति पर है। इसके अलावा अशोकवन से बुटीबोरी मार्ग पर 8 मेट्रो स्टेशनों का निर्माण कार्य जारी है। इस मार्ग पर 590 में से 48 (8.13%) गर्डर स्पैन पूर्ण किए जा चुके हैं। साथ ही, 3 में से 2 स्टील ब्रिज का कार्य भी प्रगति पर है।
*नागपुर मेट्रो फेज–II का विस्तार :*
फेज– II के अंतर्गत कुल 43.8 किमी लंबाई के मार्ग पर 32 मेट्रो स्टेशनों का समावेश किया गया है, जिससे नागपुर शहर का विस्तार उपनगरीय क्षेत्रों तक होगा।
इसमें खापरी से MIDC ESR (18.5 किमी, 10 स्टेशन) मार्ग शामिल है, जिसमें ईको पार्क, नेशनल कैंसर हॉस्पिटल, अशोकवन, डोंगरगांव, मोघाव, मेघदूत CIDCO, बुटीबोरी पुलिस स्टेशन, म्हाडा कॉलोनी, MIDC KEC और MIDC ESR मेट्रो स्टेशन प्रस्तावित हैं।
नागपुर मेट्रो के फेज–II के पूर्ण होने से शहर की सार्वजनिक परिवहन व्यवस्था और अधिक सशक्त होगी तथा उपनगरों के साथ संपर्क में महत्वपूर्ण सुधार होगा।
MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LIMITED
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प: पश्चिम विदर्भाचा भविष्य उज्जवल करण्याची दिशा
पश्चिम विदर्भ, जो महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, नेहमीच दुष्काळाने त्रस्त राहिला आहे. सिंचन सुविधांचा अभाव या भागासाठी एक मोठा चांगलाच प्रश्न ठरला. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लोटला. परंतु, एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज या भागाच्या भाग्याचा आदर्श बनला आहे – वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प.
पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पाणी मिळविण्याचा एक महत्त्वपूर्ण उपाय म्हणून उभा राहिलेला हा प्रकल्प म्हणजे वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प. या प्रकल्पाने शेतकऱ्यांना सिंचन सुविधा प्रदान करणे, जलस्रोतांचे अधिक आणि योग्य व्यवस्थापन करणे, आणि या भागातले जलवापराचे प्रश्न सोडवणे यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
२०१४ मध्ये विदर्भ सुपुत्र, जलतज्ञ डॉ. प्रवीण महाजन यांनी ३ नोव्हेंबर रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकल्पाची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला या प्रकल्पाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या, आणि याचाच परिणामस्वरूप २०१७ मध्ये प्रकल्पाची सविस्तर आराखडा तयार करण्यात आला.
पण या प्रकल्पासाठी असलेल्या कागदावर उपलब्ध पाण्याचे प्रमाण एक मोठा मुद्दा होता. वैनगंगा नदीतील पाणी तेव्हा त्यात समाविष्ट करण्यात आलेले नसले तरी, त्यावरून गोसीखुर्द धरणाने भरलेल्या पाण्याचा योग्य उपयोग करण्याचा विचार झाला. दुष्काळग्रस्त विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये पाणी पोहोचविणे आवश्यक होते, त्यामुळे या प्रकल्पाला शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये मान्यता दिली.
दहा वर्षांच्या कष्टानंतर, २०२४ मध्ये प्रकल्पाचे सर्वेक्षण व वर्क आर्डर जारी करण्यात आले. या प्रकल्पाचे महत्व अजून वाढले, जेव्हा राज्यपाल महोदयांनी १२ जुलै २०२४ रोजी या प्रकल्पास तत्त्वतः मान्यता दिली. नंतर कृषी आयुक्तालयाने पीक रचनेस मान्यता दिली आणि जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केला.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे उद्दिष्ट आता स्पष्ट झाले आहे. ४२६.५ किमी लांबीचा हा प्रकल्प सात जिल्ह्यांमधून प्रवास करत असताना ३१ नव्याने उभारलेल्या धरणांचे सुद्धा समावेश करतो. या प्रकल्पामध्ये १,७७२ दलघमी पाणी उचलण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यामध्ये १,२८६ दलघमी पाणी सिंचनासाठी आणि ३२ दलघमी पाणी पिण्यासाठी वापरले जाईल.
यात ४१ धरणे, १३.८३ किमी बोगदे, २५.९८ किमी बंद नलिका, आणि ६ पाणी उचल स्थळे असतील. यामुळे एकूण ३ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन होईल, ज्यामुळे सुमारे १० लाख एकर जमीन हिरवा शालू परिधान करेल.
हा प्रकल्प फक्त सिंचनाच्या दृष्टीनेच नाही, तर औद्योगिक व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे शेतकऱ्यांची शेती समृद्ध होईल, पाणी मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवू शकतील, आणि रोजगाराच्या संधी वाढतील.
या प्रकल्पाचा अंतीम खर्च ८८ हजार कोटींपर्यंत पोहचला असून, पुढील काही वर्षांत तो १२० हजार कोटींवर पोहचण्याचा अंदाज आहे. ४२६.५ किमी लांबीचा हा कालवा विदर्भातील सात जिल्ह्यांना समृद्ध करेल.
याव्यतिरिक्त, प्रकल्पाच्या ठिकाणी ८८४ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता सुद्धा कार्यान्वित केली जाईल. या प्रकल्पामुळे या भागातील पाणी पातळी वाढेल, जे अप्रत्यक्षपणे ४-५ लाख एकर अतिरिक्त सिंचन क्षेत्र तयार करेल.
या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जमीन संपादन, जो १९८१८ हेक्टर क्षेत्रासाठी आवश्यक आहे, आणि यामुळे १०९ गावं प्रभावित होणार आहेत.
अशा एका बहुआयामी प्रकल्पामुळे विदर्भ सुजलाम सुफलाम होईल. शेतकऱ्यांसाठी हे एक मोठं आणि ऐतिहासिक पाऊल असेल, आणि संपूर्ण महाराष्ट्राचा पाणी व्यवस्थापनासोबत एक नवीन अध्याय सुरु होईल.














Discussion about this post