• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, June 7, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

मुंबई शहर आणि नवी मुंबईच्या बरोबरीत चंद्रपूर; का आणि कशासाठी? आकडेवारी जाहीर!

Khabarbat™ by Khabarbat™
January 16, 2024
in local News, Maharashtra, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात द्वितीय

 पोलीस अधीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई येथे सन्मानित

वाचण्यासारखी बातमी

चंद्रपूर जिल्हा बँकेत भरती प्रक्रिया सुरु; असा दाखल करा ऑनलाईन अर्ज

कोण आहे सूरज चव्हाण? कसा ठरला Bigg Boss

समुद्राच्या पोटात जीव मुठीत

आनंदवन येथील युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कस्टडीत केली आत्महत्या

चंद्रपूर, दि. 16: सर्वोच्च न्यायालय, रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार सन 2022-2023 च्या तुलनात्मक आकडेवारीनुसार जिल्ह्यांनी क्रमवारीनुसार उद्दिष्ट साध्य केले असून चंद्रपूर जिल्ह्याने रस्ते अपघात व त्यातील मृत्यू कमी करण्यात राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. मुंबई शहर आणि उपनगर प्रथम तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यात सन 2022 मध्ये एकूण 840 रस्ते अपघातात एकूण 434 मृत्यू तर सन 2023 मध्ये एकूण 791 रस्ते अपघातात एकूण 349 मृत्यू झालेत. सन 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 49 अपघात कमी आणि 85 मृत्यू कमी करण्यात यश आले आहे.

सन 2022 मध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात एकूण 1 हजार 895 रस्ते अपघातात एकूण 371 मृत्यू तर सन 2023 मध्ये एकूण 1 हजार 473 रस्ते अपघातात एकूण 283 मृत्यू झालेत. तसेच सन 2022 मध्ये नवी मुंबईमध्ये एकूण 727 रस्ते अपघातात 293 मृत्यू झालेत तर सन 2023 मध्ये एकूण 755 रस्ते अपघातात एकूण 241 मृत्यू झालेत.

रस्ते अपघात कमी करण्यात चंद्रपूर राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे. मुंबई शहर आणि उपनगर प्रथम तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याने रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपायोजना राबवून जिल्ह्यामधील रस्ते अपघात कमी केले आहेत. व नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमांचे पालन केल्याने चंद्रपूर जिल्ह्याला हा सन्मान मिळाला आहे, ही उल्लेखनीय बाब आहे.

अपघातावर नियंत्रणासाठी उपाययोजना:

सन 2022 मध्ये घडलेल्या रोड अपघाताचे रोड प्रकार,अपघाताच्या वेळा, अपघाताचे कारण पोलीस ठाणे याप्रमाणे घडलेल्या अपघाताचे विश्लेषण करण्यात आले. विश्लेषणावरून अपघातामध्ये पहाटे 4 ते 8 वाजेच्या दरम्यान रोड अपघाताची संख्या अधिक प्रमाणात असून धोकादायक ड्रायव्हिंग तसेच भरधाव वेगाने वाहन चालविणे यावर नियंत्रण करण्यासाठी सन 2023 मध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत दारू पिऊन वाहन चालविणे, विना सिटबेल्ट आणि विना हेल्मेट वाहन चालविणे ही त्रिसूत्री मोहीम संपूर्ण जिल्ह्यात माहे डिसेंबर 2022 पासून राबविण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सन 2022 मध्ये विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्या 9 हजार 258 वाहन चालकांवर कारवाई तर विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या 14 हजार 390 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. सन 2023 मध्ये विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्या 20 हजार 715 वाहन चालकांवर तर विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या 35 हजार 721 व्यक्तींवर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस ठाणे व  वाहतूक नियंत्रण शाखेकडून त्रिसूत्री मोहीम सातत्याने राबविण्यात आली.

मोटर वाहन कायद्यातंर्गत कार्यवाही :

मोटर वाहन कायदा कलम 185 प्रमाणे केलेल्या कार्यवाहीत 2 हजार 373 प्रकरणात 2 कोटी 25 लक्ष 30 हजार इतका दंड आकारण्यात आला. रोडवर धोकादायक स्थितीत वाहन उभे करून ठेवणाऱ्या वाहन संदर्भात सन 2023 मध्ये एकूण 2 हजार 643 वाहनांवर कलम 283 भां.द.वी.प्रमाणे तसेच भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या 117 वाहन चालकांविरुद्ध  दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र अधिक प्रमाणात असून कोळसा तसेच इतर जड वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने वाहनावर ताडपत्रीचा वापर करणे अनिवार्य आहे. यासाठी स्वतंत्र मोहीम राबवून 1 हजार 302 केसेस करण्यात आल्या. 31 डिसेंबर 2022 व 23 अपघात मुक्त ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यात राबवून प्रभावी त्रिसूत्री मोहीम राबविण्यात आली. परिणामी दोन्ही वर्षी अपघात मुक्त 31 डिसेंबर ठेवण्यात यश प्राप्त झाले.

आरटीओ व वाहतूक शाखेची संयुक्त मोहीम

यामध्ये अल्पवयीन चालकांवर कार्यवाही करून प्रत्यक्ष त्यांच्या पालकांना पाचारण करून त्यांना समुपदेशन करण्यात आले. भरधावपणे बुलेट चालविणाऱ्या युवकांविरुद्ध स्वतंत्र मोहीम राबवून प्रभावी कार्यवाही करण्यात आली. यामध्ये एकूण 81 बुलेट वाहने जप्त करण्यात आली. कर्कश आवाज करणारे वापरात असलेले सायलेन्सरचा नाश करण्यात आला.

व्यापक जनजागृती

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण शाळा, कॉलेज येथे भेटी देऊन वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. वाहतूक शाखेमार्फत जिल्ह्यातील विविध ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये जाऊन वाहन चालकांना रस्ते सुरक्षाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. एनजीओ/वाहतूक शाखा/आरटीओ यांच्या संयुक्त माध्यमातून राज्य महामार्गावरील वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले.

हा जिल्हा प्रशासनाचा सन्मान – किरण मोरे

सन 2023 मध्ये जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व समिती सदस्यनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले असून हा संपूर्ण चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा सन्मान आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी रस्ता सुरक्षा या विषयाला विशेष महत्व व वेळ दिला. प्रसंगी कठोर भूमिका घेऊन सर्व कार्यकारी अधिकारी यांच्याकडून काम करून घेतले. त्यामुळेच जिल्ह्यात अपघातमृत्यू प्रमाण कमी झाले आहे. सन 2024 मध्ये सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील अपघात कमी होण्यासाठी अधिक चांगले काम करू, असे श्री मोरे यांनी म्हटले आहे.

जीवन अतिशय अमूल्य आहे. जीवापेक्षा कोणतीच संपत्ती मोठी नाही. सृष्टीच्या नियमानुसार नैसर्गिक मृत्यु सर्वांनाच आहे. मात्र अनमोल जीव निष्काळजीपणामुळे रस्ते अपघातात गमावू नका. प्रत्येक जण रस्ता सुरक्षा समितीचा सदस्य आहेत. त्यामुळे आपल्या हातून कोणतीही चूक किंवा अपघात होणार नाही, असा संकल्प करून चंद्रपूर जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सकारात्मक जनजागृती आणि शास्त्रशुद्ध नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलिस विभागामार्फत जिल्ह्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ करतांना श्री. मुनगंटीवार बोलत होते. मंचावर प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियान हा अतिशय महत्वाचा विषय आहे. अपघात घडणार नाही, असा संकल्प करणे गरजेचे आहे. यासाठी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करून सप्ताह, पंधरवडा किंवा महिनाभर हे अभियान न राबविता 365 दिवस रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबवावे. भविष्यात अपघात शून्यावर आणायचे असतील तर तरुणांना वाहन सुरक्षेच्या कायद्याचे ज्ञान देणे गरजेचे आहे.

एखाद्याचा जीव वाचविणे हे सर्वांत पुण्याचे काम आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघातप्रवण स्थळांची (ब्लॅक स्पॉट) यादी करून त्याचा आराखडा तयार करावा व शासनाकडे त्वरीत पाठवावा, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्राचे वर्णन हे ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे चांदा हाच महाराष्ट्राचा खरा चेहरा आहे. हा चेहरा अपघातांमुळे विद्रूप होऊ नये. इतर जिल्ह्यांनी चंद्रपूरचा हेवा करावा, असे अपघातमुक्त चंद्रपूरचे नियोजन झाले पाहिजे. चंद्रपूर, बल्लारपूर व इतर ठिकाणी ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’सह सीसीटीव्ही बसवावे. जिल्ह्यातील सर्व ‘स्पीड ब्रेकर’वर सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘रेडियम’ आणि बोर्ड लावावे, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, अपघात कमी करण्याच्या उपाययोजनांमध्ये चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रत्येक चवथ्या मिनिटात देशात अपघातामुळे एक मृत्यु होतो. ही मनुष्यनिर्मित आपत्ती आहे. रस्ता सुरक्षेबाबत नियमांची जनजागृती आणि अंमलबजावणी ही पालकांचीसुद्धा जबाबदारी आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू म्हणाल्या, 2022 आणि 2023 मध्ये 31 डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात एकही अपघात आणि मृत्यु झाला नाही. बहुतांश नागरिक पोलिस दिसल्यावर हेल्मेट किंवा सिटबेल्ट लावतात. पोलिसांसाठी नव्हे तर नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी याचा वापर करावा.

मनपा आयुक्त पालीवाल म्हणाले, मोबाईल आणि गाड्या अपडेट होत आहे. मात्र त्याप्रमाणे ते वाहन चालविण्याचे ‘स्किल अपडेट’ होणे गरजेचे आहे. कॅन्सरपेक्षा जास्त मृत्यु रस्ता अपघातात होतात. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून जागरुक नागरिक निर्माण होणे गरजेचे आहे.

दारुबंदीच्या काळात कमी अपघात

अपघातांची अनेक करणे असून शकतात.  मानसिक तणाव, मद्यप्राशन करीत वाहन चालविणे अशा स्वरूपात अपघातांचे विश्लेषण केले जाते. दारुबंदीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची संख्या कमी होती. आता मात्र ती वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मुख्य चौकात मद्यविक्रीचे परवाने दिले जात आहेत, ही शोकांतिका आहे, याबाबत पुढे असे परवाने देऊ नये, असे मत यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

प्रभावी जनजागृतीवर भर

रस्ता सुरक्षा अभियानात लोकांच्या हृदयाला भीडेल अशी जनजागृती करण्यात यावी. मनपा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनी रस्ता सुरक्षा अभियान या विषयावर घोषवाक्य स्पर्धा आयोजित करावी. निबंध स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ट स्पर्धकांसाठी पारितोषिक ठेवावे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Post Views: 686
Tags: Chandrapurmumbaipolice
SendShareTweetScan
Previous Post

आर्थिक साक्षरतेसाठी अमृतकाळ – व्हिज्युअलाइजिंग इंडिया@१०० उपक्रम:

Next Post

ग्रामसभेच्या सशक्तीकरणासाठी कोअर टीम सदस्यांचे सशक्तीकरण आवश्यक

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
0
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025
0
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
0
Load More
Next Post
ग्रामसभेच्या सशक्तीकरणासाठी कोअर टीम सदस्यांचे सशक्तीकरण आवश्यक

ग्रामसभेच्या सशक्तीकरणासाठी कोअर टीम सदस्यांचे सशक्तीकरण आवश्यक

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
0
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025
0

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
0
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram



भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा
No Result
View All Result
  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • Maharashtra
  • Politics
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL