उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग (Kedarnath Helicopter Crash) जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात रविवारी (१५ जून २०२५) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. केदारनाथहून गुप्तकाशीच्या दिशेने निघालेलं एक हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळील जंगलात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील संपूर्ण जयसवाल कुटुंबाचा समावेश आहे.
Uttarakhand helicopter crash | Today, at around 5:20 am, a helicopter, which was going from Shri Kedarnath Dham to Guptkashi, has been reported to have crashed near Gaurikund. There were six passengers, including the pilot (5 adults and 1 child). The passengers in the helicopter… pic.twitter.com/AVGtuxWKGj
— ANI (@ANI) June 15, 2025
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग (7 Dead In Chopper Crash Near Kedarnath) जिल्ह्यातील केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर सकाळी 5.20 वाजता गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात पायलटचाही मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण नारायण दरम्यान घडली. हेलिकॉप्टर कोसळण्याचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताची पुष्टी केली आहे. गौरीकुंडवर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच SDRF व NDRF च्या टीम्स तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. नेपाली महिलांनी जंगलात घास कापताना अपघाताची माहिती प्रशासनाला दिली. घटनास्थळ अतीव दुर्गम जंगलात असल्यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळले असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरो (Aircraft Accident Investigation Bureau) करणार आहे. सध्या सर्व हेली सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील वणी येथील संपूर्ण कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूनं गावात शोककळा पसरली आहे. यामधील २३ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. संबंधित यंत्रणा आता अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत. वणी येथील राजकुमार सुरेश जायसवाल हे कोळशाचे मोठे व्यापारी असून, 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 दरम्यान अवघ्या विदर्भाचे लक्ष केंद्रित करणारा ऐतिहासिक ‘काशी शिवमहापुराण’ वणी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या संगीतमय सुश्राव्य वाणीचा कार्यक्रम जयस्वाल यांच्यातर्फे त्यांच्या पुढाकारणे आयोजित करण्यात आला होता.
या दुर्घटनेत राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल, आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल यांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, या कुटुंबाचा चिमुकला मुलगा विवान सध्या पांढरकवडा येथील आजोबांकडे थांबलेला असल्यामुळे तो या दुर्घटनेतून बचावला. मृत्यूमुखी पडलेली चिमुरडी काशी हिचे नामकरण एक वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. तिच्या नावावरून वणीमध्ये काही महिन्यांपूर्वी काशी शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनाच्या आधारे करण्यात आले होते. जयस्वाल कुटुंबाच्या अपघाती निधनामुळे वणी शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिक सोशल मीडियावरही शोक व्यक्त करत आहेत.
मृत व्यक्तींची माहिती:
कॅप्टन राजबीर सिंह चौहान – पायलट, रहिवासी जयपूर
विक्रम रावत – बीकेटीसी कर्मचारी, रहिवासी रासी, ऊखीमठ
विनोद देवी – वय 66, रहिवासी उत्तरप्रदेश
तृष्टि सिंह – वय 19, रहिवासी उत्तरप्रदेश
राजकुमार सुरेश जायसवाल – वय 41, रहिवासी वणी, यवतमाळ (महाराष्ट्र)
श्रद्धा राजकुमार जायसवाल – पत्नी, रहिवासी वणी, यवतमाळ
काशी जायसवाल – वय 23 महिने, कन्या, रहिवासी वणी, यवतमाळ
The helicopter was flying from Kedarnath to Guptkashi. Seven dead, confirms Badri-Kedar Temple committee chief Hemant Dwivedi. The deceased included a 10-year old.
Discussion about this post