नेटवर्क अभावी दाखले देणे बंद
विद्यार्थी,नागरिकांची होत आहे गैरसोय.
नवेगावबांध ग्रामपंचायत येथील प्रकार.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३० : गेल्या पाच- सहा दिवसापासून येथील ग्रामपंचायत कार्यालयात नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना विविध दाखल्यापासून वंचित राहावे लागत आहे. नेटवर्क समस्या दूर करून,नागरिकांना तात्काळ दाखले देण्यात यावेत.अशी मागणी स्थानिक विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामवाशियांनी केली आहे.
सध्या दहावी- बारावीचे निकाल लागले आहेत,त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र बनविण्यासाठी रहिवासी,जन्माचा असे विविध दाखले गरजेचे आहेत. तसेच नागरिकांना देखील विविध प्रकारचे दाखले लागतात.अशा वेळी नेमका गेल्या २६ मे सोमवारपासून नेटवर्क नाही.म्हणून ग्रामपंचायत कार्यालयातून विविध दाखले देणे बंद आहे.सध्या ऑनलाईन दाखले ग्रामपंचायत म्हणून दिले जातात. क्यूआरकोड असलेल्या दाखल्यांची गरज आहे. ऑफलाइन दाखले चालत नाही. त्यामुळे दाखल्या अभावी विद्यार्थी व नागरिकांची फारच गैरसोय होत आहे.
ग्रामविकास अधिकारी व्ही.ई.रामटेके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,नेटवर्क समस्येविषयी प्रोव्हायडरला सांगितले आहे.परंतु त्यांनी अद्यापही ही समस्या दूर केली नाही.आज पुन्हा त्याला स्मरण करून दिले आहे.
विद्यार्थी व नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नेटवर्क समस्या दूर करण्यात यावी व दाखले देण्याची व्यवस्था व्हावी.अशी मागणी विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांनी केली आहे.
Discussion about this post